पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान 20 व्या वर्षीही 100 टक्के यशस्वी ! मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण….

[avatar]
पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान 20 व्या वर्षीही 100 टक्के यशस्वी !
मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण !
 पुणे (विशेष प्रतिनिधी)धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान‘ सलग 20 व्या वर्षीही 100 टक्के यशस्वी झालेहिंदु जनजागृती समितीखडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान 18 मार्च या दिवशी राबवण्यात आलेया वेळी 100 हून अधिक उपस्थित कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंग खेळून येणार्‍यांना रोखले अन् त्यांचे प्रबोधनही केलेधूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्र विसंगत आहेहिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठीतसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहेभगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमा पुजनाने अभियानाला प्रारंभ झालाया प्रसंगी आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलचे संचालकगव्यशास्त्री डॉस्वानंद पंडित यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केलेया वेळी आयुर्वेद गोविज्ञान कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक भोसलेइतिहास अभ्यासक नंदकिशोर मतेहिंदु जनजागृती समितीचे श्रीपराग गोखलेसनातन संस्थेचे श्रीविठ्ठल जाधव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

     या वेळी उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याला पाठिंबा दर्शवला आणि या अविरत कार्याचे कौतुक केलेहिंदु जनजागृती समिती मागील 19 वर्षे हा उपक्रम राबवत आहेहे सातत्य वाखाणण्याजोगे आहेसंपूर्ण दिवसभर जलाशयाचे रक्षण करणे हे सामाजिक बांधिलकीचे काम ही संस्था करत आहेयात लहान मुलेज्येष्ठ नागरिक आणि महिला कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होऊन सर्वाना शिस्त लावण्याचे कार्य करत आहेत असे म्हणून उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक केलेखडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकिरखडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पोपटराव शेलारखडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र राऊत आणि दत्तात्रय कापसेपुणे मनपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब नवलेगोर्‍हे ग्रामपंचायत सदस्य बाबा खिरीडसाहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे आणि ग्रामस्थ यांनीही अभियान स्थळी भेट दिलीप्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले.

   प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी पासून सायंकाळी पर्यंत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून अभियान राबवण्यात आलेया अभियानाला पोलीसप्रशासनाचेही उत्तम सहकार्य लाभलेसर्वांच्या सहकार्याने अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झालेअशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 22 मार्चलाही हे अभियान राबविण्यात येणार आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close