जागतिक महासागर दिनानिमित्ताने सागरी प्लॅस्टिक कचरा विषयक जागरुकता अभियान व रॅली…… 

[avatar]

जागतिक महासागर दिनानिमित्ताने सागरी प्लॅस्टिक कचरा विषयक जागरुकता अभियान व रॅली……

कोर्लई(राजीव नेवासेकर)जागतिक महासागर दिवसानिमित्ताने भारतीय मत्स्य सर्वेक्षणच्या मुंबई बेस ने मत्स्यविज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी प्लास्टिक कचरा या विषयावर जागरूकता कार्यक्रम तसेच भाषण स्पर्धा महाविद्यालयातील सभागृहात घेण्यात आली.यादिवशी मिरकरवाडा बंदरावर जागरूकता रॅलीचें आयोजन करण्यात आले होते.
भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई बेस चे इन्चार्ज
अशोक कदम यांनी Glolitter प्रोजेक्ट बद्दल आणि समुद्रातील प्लास्टिक कचरा याबद्दल माहिती देताना प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सर्वांनीच करावेत आणि विद्यार्थ्यांनी त्यात विशेष भूमिका निभावावी.असे सांगितले.
या निमित्ताने आयोजित भाषण स्पर्धेमध्ये १० स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यात प्रथम पारितोषिक कुमार गोविंद चौधरी,दुसरे बक्षीस कुमारी चांदणी दत्त तर तिसरे बक्षीस कुमारी शिवकन्या सोनवणे यांनी पटकावले.
यावेळी प्रोफेसर डॉ. डबीर पठाण, डॉ. अनिरुद्ध अडसूळ, डॉ. सन्देश पाटील, डॉ. राहुल सदावर्ते प्रमुख मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांना चषक व रोख बक्षिसे देण्यात आली.
पांढरा समुद्र भाट्ये मिऱ्या येथे प्राध्यापक अनिरुद्ध अडसूळ यांनी महासागराच्या पूजेचे तथा बीच स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबई बेसच्या टीमने विद्यार्थ्यांसोबत समुद्रकिनारा स्वच्छ केला तसेच महासागरातील प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी जागरूकता रॅली चे आयोजन मिरकरवडा बंदर ते मच्छी मार्केट पर्यंत मुंबई बेस च्या वतीने विद्यार्थी आणि मच्छीमारांच्या सहकार्याने जागरुकता रॅली काढण्यात आली.मुंबई बेस चे वैज्ञानिक डॉक्टर देवानंद उईके, स्वप्नील शिर्के, हर्षवर्धन जोशी, संजीव कुमार आणि मुजावर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close