विठ्ठलनामाच्या जयघोषात चिमुकल्यांनी काढलेल्या दिंडीने मुरुडकरांचे हरपले भान…… 

[avatar]

विठ्ठलनामाच्या जयघोषात चिमुकल्यांनी काढलेल्या दिंडीने मुरुडकरांचे हरपले भान……

कोर्लई(राजीव नेवासेकर) आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुरुडशहरांमध्ये आज साक्षात जणू पंढरी अवतरली होती. विद्यार्थ्यांची दिंडी मुरुड शहरात फिरत असताना साक्षात विठ्ठल व रुक्मिणी अवतरले असल्याचा अनुभव मिळाला.ही दिंडी पाहून मुरुडकर हरपून गेले होते. विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण मुरुडनगरी दुमदुमून गेली होती.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून मुरुडमध्ये सर्व शाळा,महाविद्यालयात दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली जाते. यानिमित्ताने ओंकार बालवाडी, ओंकार विद्या मंदिर,ओंकार महाविद्यालयांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हुबेहूब विठ्ठलासारखे व रुक्मिणीसारखे सजवण्यात आले होते. या वारीत विद्यार्थ्यांनी वारकरी रूपातील डोक्यावर पांढरी टोपी, सफेद सदरा आणि लेंगा परिधान केला होता. हातामध्ये टाळ घेऊन विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करीत होते. विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून डोक्यावरती तुळस घेतली होती.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close